Search This Blog

महाराष्ट्राचा भूगोल आवश्यक माहीत

• विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
• पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
• आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
• शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
• पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
• पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.
• पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
• नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.
• भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे रेखावृत्त मिर्झापूर (उ. प्र.) वरून ठरते.
• तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते.
• वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते.
• संदेशवहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो.
• इंदिरा पॉंईट हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7 वा क्रमांक आहे.
• मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7517 किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
• भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.
• गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे.
• भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास द्वीपकल्प म्हणतात.
• कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
• दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात.
• अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.